| 'ताप'दायक? Posted: 14 Jul 2011 04:40 PM PDT  पूर्ण विश्रांती हाच साध्या तापावरचा परिणामकारक उपाय आहे. पण आपल्या धावपळीच्या जीवनात आपण ताप घालवायला औषधे वापरू लागलो. आपली प्रतिकारशक्ती कमी होत चालली आणि विषाणू मात्र अधिकाधिक प्रबल होत चालले आहेत. त्यामुळे अँटिबायोटिक्सचा वापरही वाढला आहे. ताप हा खरे तर तापदायक नाही. तो आपल्याला आजाराविषयी सावध करणारा आहे. त्यामुळेच औषधाने ताप दडपून टाकण्याऐवजी त्यामागची कारणे शोधायला हवीत. पूर्वी पावसाळ्यात सर्दी-तापाच्या रुग्णांत वाढ व्हायची. सर्दी असली की अंगात थोडी कसकस असायची. काही वेळा तापही अंगात असायचा. पण त्याचे काही वाटायचे नाही. साध्या पॅरासिटामॉलने रुग्ण बरे व्हायचे. तुळशीची पाने टाकून गरम पाण्याचा वाफारा आणि सुंठीचा काढाही सर्दीच्या रुग्णांना पुरायचा. पण गेल्या काही वर्षांत आम्हाला तापही तापदायक वाटू लागलाय. प्रदूषण वाढले आहे. व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारपद्धती यामुळे आपली प्रतिकारशक्तीही कमी होते आहे. या पार्श्वभूमीवर विषाणू मात्र दिवसेंदिवस साध्या औषधांना न जुमानण्याची क्षमता मिळवत आहेत. त्यामुळे बहुतेक रुग्णांना साध्या औषधाने बरे वाटले नाही, तर अँटिबायोटिक्स देण्याची वेळ येते.  
|
| मूळव्याध Posted: 14 Jul 2011 04:40 PM PDT मूळव्याध आठ महाव्याधींपैकी एक. वेळीच योग्य उपचारांच्या अभावी बरे होणे अतिशय अवघड. असंयम हे मूळव्याधीचे एक कारण आहे. "आ युर्वेद उवाच' या सदरात सध्या आपण रोगांचे निदान आयुर्वेदानुसार कसे केले जाते, याविषयी माहिती घेतो आहोत. नेमके आणि पक्के निदान करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांची आवश्यकता असते, यात वाद नाही. मात्र निदान करण्यासाठी वैद्याला किती गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, हे यातून समजू शकते. निदान करण्यासाठी अत्यावश्यक अशी जी लक्षणे- त्यांचीही थोडीफार माहिती रुग्णाला असली तर निदानाचे काम सोपे होऊ शकते, त्यानुसार रुग्णाला आहार-आचरणात बदल करणे शक्य होते. अतिसार, ग्रहणीनंतर आपण या दोघांशी साधर्म्य असणाऱ्या अर्श म्हणजेच मूळव्याध या रोगाची माहिती घेणार आहोत. आयुर्वेदात मूळव्याधीला 'अर्श" म्हटले जाते. "अरिवत् प्राणान् श्रुणाति हिनस्तीत्यर्शांसि ।' असा अर्श या शब्दाचा अर्थ आहे. जो मांसाकुर गुदमार्गात अवरोध उत्पन्न करून मनुष्याला शत्रूप्रमाणे कष्ट देतो तो अर्श व्याधी होय. मूळव्याध हा आठ महाव्याधींपैकी एक सांगितला आहे. महाव्याधी म्हणजे असे व्याधी- जे वेळीच योग्य उपचारांच्या अभावी बरे होणे अतिशय अवघड असतात.  
|
| ताण मनाला, ताप तनाला Posted: 14 Jul 2011 04:40 PM PDT  सध्या मनुष्याचे जीवन आधीच दगदगीचे झालेले आहे. त्यात जर सभोवतालच्या गोष्टींचा स्वीकार हसतखेळत न करता मानसिक ताण घेतला, तर शरीराला ताप येईल व मनुष्याची वार्धक्याकडे वाटचाल अधिक गतीने होईल, अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकेल. ॐकार गुंजनामुळे शरीराला आवश्यक असणारी प्रतिकारशक्ती, आरोग्य हे सर्व साध्य होईलच पण मानसिक ताण दूर होऊन मनाला आनंदित, प्रफुल्लित व शांत अवस्था प्राप्त झाली तर "ताप'ही दूर ठेवता येतील. स काळी सकाळी अकाउंट्स ऑफिसमधून जोराने चाललेली चर्चा ऐकू आली, म्हणून चौकशी केली तेव्हा कळले, की एक गृहस्थ शिबिराचे पैसे भरण्यासाठी आले आहेत, पण पैसे घेण्यासाठी कोणी नाही म्हणून ते गृहस्थ रागावलेले असून, त्यांची आरडाओरड चालू आहे. पैसे घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते आज कामावर आलेले नसल्याने हा प्रसंग आला होता. त्यांचे म्हणणे, ऑफिसमधल्या इतर कोणीतरी पैसे घ्यावेत, पण आज त्या ऑफिसमधल्या एकूण तीन व्यक्ती गैरहजर आहेत. फक्त शिपाई हजर आहे, त्यामुळे तो पैसे घेऊन पावती देऊ शकत नव्हता.  
|
| प्रश्नोत्तरे Posted: 14 Jul 2011 04:40 PM PDT  मा झ्या मुलाचे वय 21 आहे. त्याला श्वासाचा त्रास होतो. इन्हेलर चालू आहे. कोणते आयुर्वेदिक औषध घ्यावे हे कळवावे. ... सौ. मंगला उत्तर - इन्हेलर घेण्याने श्वासाचा त्रास थोड्या वेळापुरता कमी झाला तरी पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून योग्य उपचार घेणे आवश्यक असते. आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्यांकडून प्रत्यक्ष तपासणी करून औषध सुरू करणे सर्वांत श्रेयस्कर. त्याबरोबरीने छाती-पाठ-पोटाला नियमितपणे "संतुलन अभ्यंग तेल' लावण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा छाती-पाठीला तेल लावून वरून रुईच्या पानांनी शेकण्याचा उपयोग होईल. वैद्यांच्या सल्ल्याने "प्राणसॅन योग'सारखे औषध घेण्याचाही फायदा होईल. प्राणशक्ती स्वीकारण्याची फुफ्फुसांची ताकद वाढावी म्हणून अनुलोम-विलोमसारखी श्वसनक्रिया करण्याचा, "संतुलन च्यवनप्राश' किंवा "संतुलन आत्मप्राश'सारखा रसायनयोग घेण्याचाही उत्तम उपयोग होईल. म ला दर 10-15 दिवसांनी तोंड येते, सतत त्रास होत राहतो. कृपया मार्गदर्शन करावे....रूपा ठाकूर उत्तर - वारंवार तोंड येणे हे अपचनाचे आणि शरीरात उष्णता वाढल्याचे लक्षण असते.  
|
| थंडी-ताप Posted: 14 Jul 2011 04:40 PM PDT उष्णतेने त्रस्त झालेल्या जिवाला, पृथ्वीला पावसाळ्यामुळे दिलासा मिळतो खरा, पण बरोबरीने अनेक आजारांनाही आमंत्रण मिळत असते. सर्दी, ताप, जुलाब, कावीळ, साथीचे रोग यांना सहज वाव मिळतो तो पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये हवामान थंड व दमट झालेले असते. पाऊस पडत असतो. बाह्य वातावरणात ज्याप्रमाणे पावसाळ्यात बुरशी येते, अन्नपदार्थ पटकन खराब होतात, जीवजंतू, किडे-कीटकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले दिसते, त्याचप्रमाणे शरीरातही बुरशीमुळे (फंगल इन्फेक्शन) किंवा अदृश्य जीवजंतू (जीवाणू, विषाणूंमुळे होणारे इन्फेक्शन) मुळे रोग होण्याचे प्रमाण वाढते. तापाची लक्षणे पावसाळ्यामध्ये ताप येतो. त्याची लक्षणे सहसा आयुर्वेदात सांगितलेल्या वात-कफ ज्वराशी मिळती-जुळती असतात. स्तैमित्यं पर्वणां मेदो निद्रां गौरवमेव च । शिरोग्रहः प्रतिश्यायः कासः स्वेदाप्रवर्तनम् ।। संतापो मध्यवेगश्च वातश्लेष्मज्वराकृतिः ।।...माधवनिदान शरीर स्तिमित म्हणजे जखडल्यासारखे वाटते, विशेषतः ओल्या फडक्याने बांधून ठेवल्यासारखे वाटते. शरीरातील सांधे दुखतात. खूप झोप येते. सर्व शरीर जड झाल्यासारखे वाटते. डोके जड, जखडल्यासारखे वाटते.  
|